Saturday, August 30, 2014

स्त्रीचे उदर अपवित्र कसे असू शकते ?????


स्त्रीचे उदर अपवित्र कसे असू शकते  ?????
स्त्रीला मसिक पाळी म्हणजे तिच्यातील  एग बिजारोवान झाल्यास तो धरून ठेवण्यासाठी गर्भाशयाच्या रेशा (lining ) जरा जाड (Thick )होतात  जर तो एग fertile नाही  झाला तर त्या रेश्या दर महिन्याला रक्त स्त्रावा द्वारे गळून पडतात. ही प्रक्रिया अतिशय नैसर्गिक आहे स्त्रियांना ह्याची सवय असते.हिंदू धर्माशिवाय दुसऱ्या कुठल्याही धर्मात असे पाळल्या जात नाही. स्त्रियांच्या बाबतीत दसरे पश्न दुसर्या देशांमध्ये पण होते आपल्याकडे मुख्य कारण असे की शिक्षण आणि विज्ञानाचा संपर्क आपल्या देशात इंग्रज आल्यावर आला. त्यामुळे लोकांना धर्म सांगेल तेच प्रमाण होते. आता आपल्या येथे स्त्री दैवत पण आहे दुर्गा, लक्ष्मी, सरस्वती, पार्वती ह्यांना शक्ती मानल्या जाते पण त्यांना दैवत्व प्राप्त असल्यामुळे त्यांना हे नैसर्गिक नियम पण लागू होताच असतील.  ह्याचा  विचार केल्या जाता नाही. काही घरनमध्ये आजही वेगळे बसवले जाते, जर स्त्रियांना चार दिवस मासिक पाळीत देवळात जाता येत नाही. तर स्त्री दैवतांची चार दिवस पूजा करू नये. दुसरे नवरात्र हा देवीचा सण आहे ती स्त्री दैवत आहे मग नवरात्रात का स्त्रीच्या मासिक पाळीचा विटाळ व्हावा मी असा प्रश्न माझ्या आजीला जेव्हा विचारला तेव्हा माझ्या तोंडात थप्पड मारायचे बाकी ठेवले होते.  मी त्यावेळला १३ वर्ष्याची होती  .माझे एकच म्हणणे आहे ज्या उदारातून स्त्री व पुरुष दोघांचाही जन्म होतो ते अपवित्र कसे असू शकते आपण पुथ्वीला माता संबोधतो मग स्त्रीला मासिक पाळीत विटाळ का मानतो ? आपल्या विचार करायची पद्धत आजही जंगली आहे. वेद ज्या काळात लिहिले होते त्या  काळानुसार ह्या प्रथा प्रचलित होत्या आज विज्ञान युगात आपल्याला माहित आहे गर्भाशय ही मानवाची जन्मभूमी आहे.  स्त्रीला मातृत्वाचे वरदान आहे. मग ती अपवित्र कशी ?
धन्यवाद
शब्द शृंगार
copyright© Laxmi Desai

Friday, August 29, 2014

जोडीदार 
आपल्या इथे ८०टक्के स्त्रियांनचा घरात मानसिक व शारिक छळ केल्या जातो लहानपणी पासून त्यांना दुय्यम स्थान मिळते चूक नाही का ???????
           स्त्रियांना कर्तुत्वान करण समाजात आदरनी वागवल तरच बदल शक्य आहे.आदर मिळवायसाठी काही पुरस्कार घ्यायची गरज नसते. प्रत्येक व्यक्तीला सन्मानाने जगायचं अधिकार आहे. आपल्या इथे एक अनोळखी मुलीला एका अनोळखी मुलगा जेव्हा तिची छेड काढतो. आता त्या मुलीनी त्या मुलाला ती किती आदरणीय आहे हे कसे समजवावे? कारण तो वासनांनी बरबटलेला असतो. कुठीली स्री सार्वजनिक मालमत्ता नाही त्यामुळे असे वागणे योग्य नाही माझ हे म्हणणे आहे. घरात वयक्तिक बाबीत ज्याने त्याचे ठरवावे फक्त आपण पुरुष आहे म्हणून आपली मते घरातील बायकांवर लादणे अयोग्य आहे पण इथे पुरषांनी पहिले सुरुवात करावी लागणार कारण आपण केलेल्या शतकांच्या चुका व अत्याचार, आता स्त्रीवर्ग सबलआहे त्यांना पैशाची गरज नाही.  पण जोडीदाराची नक्कीच हे आता पुरुषांवर अवलंबून राहील आपली हेकेखोरी आत काळा प्रमाणे चालणार नाही आणि स्त्रियांनाही बऱ्याच प्रमाणात बदल घडवावा लागेल समान हक्क म्हणायचं आणि पुराषानाच जे पिढ्यान पीढ्या पासून कामे करावी लागतात त्याची जवाबदारी स्त्रियांनी पण उचलली पाहिजे यात शंका नाही. व्यक्तिमत्व विकासावर भर देणे आवश्यक आहे . प्रत्येकाच्या घरातच त्या गोष्टी शिकविल्या गेल्या पाहिजे आपली लाग्नाबाबातच्या आवश्यकता फक्त सौदर्य , शिक्षण ,नौकरी हे नुसते बघून चालणार आणि स्त्रियांनाही बऱ्याच प्रमाणात बदल घडवावा लागेल समान हक्क म्हणायचं आणि पुराषानाच जे पिढ्यान पीढ्या पासून कामे करावी लागतात त्याची जवाबदारी स्त्रियांनी पण उचलली पाहिजे यात शंका नाही व्यक्तिमत्व विकासावर भर देणे आवश्यक आहे . प्रत्येकाच्या घरातच त्या गोष्टी शिकविल्या गेल्या पाहिजे आपली लाग्नाबाबातच्या आवश्यकता फक्त सौदर्य , शिक्षण ,नौकरी हे नुसते बघून चालणार नाही.  असे लग्न करणे म्हणजे लॉटरीचे तिकीट लागण्या सारखे आहे. ते फक्त लाखो लोकात एकाच माणसाला लागते . कश्या व्यक्तिमत्वाची व्यक्ती आपली पत्नी किवा पती व्हावा ह्याचा विचार करावा . आपले लग्न डिग्रीच्या कागदाशी होत नाही, व्यक्तीशी होते त्याचा स्वभाव आपल्याला कसा हवा हे लग्न आधी नक्की बघावे . तशी शाश्वती कशाचीच नसते पण आपल्याला सावरून ,आपल्याशी जुळवून घेणारा स्वभावाच्या व्यक्तीसी लग्न केले तर बरेच प्रश्न सुटू शकतात .
धन्यवाद
शब्द शृंगार
copyright© Laxmi Desai

नैसर्गिक



नैसर्गिक

  समुद्राच्या पाण्यावर येणारी लाट माहित असत ती किनाऱ्यावर आपटून परत त्याच्यातच मिसळणार आहे.आपल्याला माहित असत.  आज पूर्णिमा आहे चंद्र पूर्ण दिसतो पण  अमावस्येच्या त्या रात्री तो दिसणार नाही हे कशे नैसर्गिक सृष्टीचे नियम आपण मान्य केलेच आहे. तसेच आपल जीवन आहे. आज दिवस चांगला गेला पण उद्या तो चागला असणार हे नक्की नाही. ते आपल्यालाही माहिती असत. पण मनुष्य स्वभावाच असा असतो की त्याला ज्यात आनंद वाटतो तेच त्याला आवड नाही तर नआवडणार्या  गोष्टीच त्याला दुख वाटत. ह्या सृष्टीवर जे जीवित अजीवीत आहे ते येणाऱ्या प्रत्येक सुख दुखाला समोर जाते .सुनामी यायच्या आधी पक्षी उडून गेले होते त्यांना येणाऱ्या आपत्तीची चाहूल लागली होती. पण झाडांना हे शक्य नाही आपणही निसर्गाचाच भाग आहोत पण आपल्या बुध्दिमातेवर आपण खूप प्रगती केली भौतिक सुखाचे जग तयार केले. आपल्याला ते खूप प्रिय आहे.त्यामुळे मनुष्य स्वतःला या सृष्टीपासून जरा का होईना पण मोठा आणि वेगळा समजतो.  आपण मनुष्य सगळ्या प्राण्यांपेक्षा स्वतःस वेगळे समजतो. त्यामुळे जे जीवनात अडथळे येतात आपण त्यांचा तिरस्कार करतो हे भौतिक जग आपणच तयार केले आहे हेच नेमक विसरतो हे वेगवेगळ्या क्षमता असलेल्या मनुष्यानसाठीच आपण तयार केले आहे. हा मुद्दा जर लक्ष्यात घेतला तर जीवन एकदम सोप होत. दुसऱ्याचे यश व आपले अपयश हे नगण्य होते. त्यात कोणी हुशार किंवा मूर्ख ठरत नाही. प्रत्येक व्यक्ती वेगळ्या वातावरणात वाढलेली असते त्यामुळे प्रत्येकाचे यश अपयश ह्याची परिभाषा पण वेगळी असते.एखाद्या शेतकऱ्याच्या घरात मुल दहावी पास झाले म्हणजे त्यांना ते मुल यशस्वी वाटते आणि एका उच्च शिक्षित घरात मुलाचे ऐंशी टक्के गुण पण कमी समजल्या जातात. यश अपयश हा आपल्या बघण्याचा दृष्टीकोन आहे. त्यापेक्षा आपण आहो त्या परिस्थितीची जाणीव ठेवली तर काल आपण काय होतो आणि आज किती प्रगती केली त्याबरोबरच विचार किती प्रगत झाले, आपण किती नाती नवी जोडली, किती वर्षांपासून प्रेमळ संबंध टिकवले पुढील जीवनात अजून आपण काय प्रगती करायची ह्याचा विचार केला तर जीवन सहज होत. स्वतः मध्ये प्रगत होण्यासाठी चढाओढ करायची दुसऱ्याच्या पुढे जाण्यासाठी नाही, त्याने आपल्या जीवनातला आनंद हिरावल्या जातो. आपल्या मध्ये असलेल्या कला गुणांना जोपासा अगदी मरेपर्यंत तेच तुम्हाला आंनद देतात.
धन्यवाद
शब्द शृंगार
 
copyright©Laxmi Desai 

हुंडा