Sunday, September 21, 2014

आदर्श मुल असण्यासाठी आदर्श पालक होणे आवश्यक आहे



आदर्श मुल असण्यासाठी आदर्श पालक होणे आवश्यक आहे
जग त्यातली लोक काय कसेही असो आपल्या मुलांचे संगोपन आपणच करतो
लहान तरी १० वर्षापर्यंत पालकान जवळ वेळ असतो कि आपले व मुलांचे घनिष्ट
संबंध प्रस्थापित करण्यासाठी करू शकता. पण जन्म झाला कि आईवडिलांना अत्यानंद होतो
स्वाभाविकच आहे . मग पहिली दोन वर्ष खूप कोड कौतुक ते मुल स्वतंत्र होते शारीरिक दृष्ट्या त्याला चालता बोलत येते. 
मग ते खोड्या काढतात तिथूनच सारे चालू होते आरडे ओरडे मारणे हा एक प्रकार पालकांमध्ये दुसरा प्रकार म्हणजे
अति लाड काही मागितले ते घेऊन द्यायचे कसेही वागले तरी कौतुकाच करायचे हे दोन्ही प्रकराची पालक त्यांची मुले सुसंकृत
वाढविण्यात अपयशी ठरतात.
जर आयुष्यात पालकांनी संयम ठेवून कुठलाही अतिरेक न करता आणि मनुष्य स्वभाव विचारात घेऊन आणि आपले मुल आपल्या
इच्छा आकांक्षा पूर्ण करण्या आलेली नाही हे जर विचारात घेतले तर त्यांच्या किशोर वयात ते हात बाहेर जात नाही. मुलांशी नेहमी बोलणे
आवश्यक आहे शाळेत काय चालू आहे कोण मित्र आहेत काय गंमत झाली हे एकूण त्यावर रागने प्रतिक्रिया देऊ नये नाही तर ते मुल कधीच
आपल्याशी बोलत नाही. त्या एवजी एक आठवड्याने जे आपल्यास नाही आवडले ते तुझ्या भविष्यसाठी हानिकारक आहे हे शांत शब्दात सांगावे.
आपण जर मुलांशी मान ठेवून बोललो कि मुले उलट उत्तर देत नाही. आपले प्रेम आणि संस्काराचा पगडा पक्का पाहिजे. मुले चांगली निघतात .
आईवदिलाच्या असयामी स्वभावाने पण खटके उडतात . बदलत्या काळाप्रमाणे पालकांना बदल्याची गरज नाही पण त्यांच्या मुलांना काळा प्रमाणे
थोडे नक्कीच बदलावे लागेल होणारे चांगले बदल पालकांनी  पण स्वीकारायला हरकत नाही पण वाईट ह्यासाठी मुलांशी सतत बोलणे अवश्य आहे
बोलणे म्हणजे रागावणे नाही किंवा तगदा लावणे नाही तर बसून निट समजावून होणारे दुष्परिणाम सांगावे.
मुला वाढवताना सुरवातीपासून  त्याला जर सागितले कि तुला तू जे मार्क ह्यावेळला घेतलेस त्यापेक्षा पुढच्या परीक्षेत थोडे जास्त घेण्याचा प्रयन्त कर.  दुसर्या मुलाचे नाव घेऊन सागितले तर स्पर्धा तुम्हीच शिकवताय असे होते.  स्वतःशीच स्पर्धा करायला शिकवायची त्यामुळे मुलांना नुनागंड येत नाही व त्याचा आत्मविश्वास वाढण्यास मदत होते .आदर्श मुल असण्यासाठी आदर्श पालक होणे आवश्यक आहे
धन्यवाद
!!!!! लक्ष्मी देसाई

विचार सरणी



विचार सरणी
माणसाला नेहमीच कशाच्या तरी आधाराची गरज भासते त्यामुळेच धर्म ,जात, देव ह्या कल्पनेला भरगोस प्रतिसाद मिळाला तसा जर पूर्वेकडील देशांचा (भारत,चीन,पराशिया (इराण)इराक )प्राचीन इतिहास बघितला ह्याच देशांनी गणित , भूमिती , अर्थाशात्र , विज्ञान , कला , साहित्य वैगरे ह्यांची पहिली प्रमेय(theorem आणि theories) मांडल्या आणि विशेष म्हणजे त्यांच्या धर्म ग्रंथ वाचून आणि काही नवीन तयार करत असताना पण पुरातन काळात समाजाची घडण वेगळी होते तिथे विचारवंताना प्राधान्य होते म्हणूनच आजही अरेबिक अंक आणि भाराचा दशंम  वापरला जातो . पण मिडवल टायीम थोडे आधी
आपल्या पूर्वेकडील देशानमधील समाज  पद्धतीत बदल घडला. माझ्या अंदाज प्रमाणे भारता परकीयांचे आक्रमण आणि सत्येने जनतेची विचार सरणी बदलली किंवा धर्मान्तारांची सक्ती किंवा ज्याप्रमाणे धर्म जोपासायचे किंवा पद्धती त्यावर नक्कीच बंधने आली असणार. त्याचमुळे जे शिक्षण व संस्कार
होत होते आणि त्यातून जे तज्ञ घडले आणी विचारवंत जनतेचा विलोप होऊ लागला.कालांतरानी इंग्रज आले त्यानंतर मात्र सगळेच बदलले काही चांगले
व काही वाईट ते आपल्या सगळ्यांच्याच परिचयाचे आहे. पण एक गोष्ट यावरून सिद्ध होते कुठलीही गोष्ट अभ्यास व मनन करून जर  जोपासल्या नाही तर त्याचे जे विपरीत परिणाम होतात ते हे. या उलट पाश्च्यात देशातील लोक आपल्या कडे येउन उदाहरणार्थ ग्रीकाने परशियाकडून भूमिती आणि कलेचे ज्ञान मिळविले. भारताती वेद नेले त्यामधील तत्वज्ञानाचा त्यांनी उत्कृष्ट उपयोग केला व ते ज्ञान त्यांनी जोपासून त्याचे अधिक विस्तार केला. पूर्वेकडील देश मात्र नुसत्या धर्माच्या आणि प्रथांच्या  जाळ्यात  अडकून मागे राहिले. बघा पटत असेल तर तुमच्या  विचारांचे  स्वागत आहे .
धन्यवाद
लक्ष्मी देसाई

हरतालिका



हरतालिका
एकदा एका लहान मुलीला
तिच्या आजीने विचारले
ये हरतालिकेची पूजा करायला
त्या मुलीने आजीला विचारले
का करू मी ही पूजा
आजी म्हणाली नातीला
तुला चांगले सौभाग्य लाभेल
लहान मुलीच्या चेहऱ्यावर प्रश्न चिन्ह आजीला
दिसले. अग तुला चांगला नवरा मिळेल .
नात आजीला विचारते मग माझा नवरापण हे व्रत करत
असेल का ? त्याला चांगली बायको मिळावी म्हणून ?
आजी म्हणते नाही मुल हे व्रत करत नाही .
नात म्हणते आजी तू आजोबांसाठी सगळे उपवास करते
आई बाबांसाठी करते पण आजोबा बाबा कधी तुझ्यासाठी
आईसाठी नाही करत.
आजीला वाटत भोळी तिची नात ती हसते ती म्हणते
की पती हा पत्नीसाठी परमेश्वर असतो.
नात म्हणते तू देवाची पूजा का करतेस ?
आजोबांची पूजा का नाही करत ?
आजी विषय टाळून विचारते मग करणार पूजा अन उपवास आज
नात: नाही आजी मी फक्त देवाचीच पूजा करेन माझा होणारा नवरा कोण हे पण
मला माहिती नाही आजी मी नवरा चांगला मिळाव यासाठी कधीच पूजा नाही करणार
माझ्या आईनेही केली होती तरी बाबा तिच्याशी चागले वागत नाही . मी अशाच माणसाशी
लग्न करेल जो माझ्याशी चांगला वागेल. नाहीतर करणार नाही.
आजी उत्तर एकूण चाट होते. नात मात्र मैत्रीण सोबत खेळायला जाते.
धन्यवाद 
******शब्द शृंगार